• कृषी क्षेत्रातील असीम योगदानाबद्दल राज्यपालांच्या हस्ते गौरव
कोल्हापूर :
कृषी क्षेत्रात दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा कृषी क्षेत्रातील सर्वोच्च ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषी रत्न’ पुरस्कारने राज्यपाल डॉ. जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पत्नी सौ. वैजयंती पाटील यांच्या समवेत डॉ. संजय डी. पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. समृद्ध, शाश्वत व आधुनिक शेतीच्या माध्यमातून महाराष्ट्र वैश्विक स्तरावर देशाचे नेतृत्व करेल असा विश्वास राज्यपाल वर्मा यांनी यावेळी व्यक्त केला.
कृषी विभागामार्फत २०२३ व २०२४ सालच्या राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे वितरण बुधवारी कृषी दिनी मुंबईतील वरळी येथे सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर वितरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी राज्य मंत्री ॲड.आशिष जयस्वाल, जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईल, कृषी सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सुरज मांढरे, कृषी संचालक रफिक नायकवडी आदी उपस्थित होते.
यावेळी कृषी क्षेत्रातील सर्वोच्च डॉ. पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार २०२३ ने डॉ. संजय डी. पाटील तर २०२४ साठी यज्ञेश सावे याना सन्मानित करण्यात आले. एकूण १८९ कृषी पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस म्हणाले,
आपण सर्वजण महान कृषी संस्कृतीचे वाहक, प्रेरणा स्रोत आहात. आपल्या कार्यामुळे पुरस्काराचा सन्मानही वाढला आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली आहे. राज्यातील अधिकाधिक शेतकरी शाश्वत शेतीकडे वळतील याची खात्री आहे.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यांनी इतरांसाठी दिशादर्शन, मार्गदर्शन करावे. त्यांच्या प्रगतीसाठी काम करावे. कृषी राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांनी आभार मानले.
यावेळी सौ. शांतादेवी डी. पाटील, सौ. वैजयंती संजय पाटील, आमदार सतेज डी. पाटील, सौ. सुप्रिया चव्हाण पाटील, डॉ. भाग्यश्री पाटील, सौ. राजश्री काकडे, माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, सौ. पूजा ऋतुराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, सौ. स्नेहा तेजस पाटील, देवश्री पाटील, अर्जुन पाटील, आर्यमन पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीय, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, कुलगुरू डॉ. मनीष भल्ला, सी.एच.आर.ओ. श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, डॉ. महादेव नरके, डी. एन. शेलार, अमोल गाताडे, पी. डी. उके, कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे प्रमुख जयवंत जगताप व सहकारी, डी. वाय. पाटील ग्रुपचे अधिकारी, पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांकडून गौरवोद्गार….
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. संजय डी. पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. पाटील यांनी कृषी, फलोत्पादन, दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून अनेकाना बळ देऊन शेतीत आधुनिकता आणली. शेती आणि शेतकरी यांच्या विकासासाठी अखंडपणे ते कार्यरत आहेत. तीन विद्यापीठांचे कुलपती म्हणूनही त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे कार्य उभारल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
हा सन्मान माझ्यासोबत कार्य करणाऱ्या सर्व शेतकरी बांधव, सहकारी, संशोधक, विद्यार्थी आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचा आहे. भविष्यातही शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी माझे प्रयत्न कायम राहतील.
– डॉ. संजय डी. पाटील
——————————
डॉ. संजय डी. पाटील यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार प्रदान
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
30
°
C
30
°
29.9
°
74 %
5.1kmh
83 %
Mon
29
°
Tue
29
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°

