कोल्हापूर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षण व सार्वजनिक वाहतुकीच्या वापराच्या आवाहनाला प्रतिसाद देत, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी आपल्या “युवा शक्ती जागर महाराष्ट्र दौऱ्या” दरम्यान, बार्शी ते सोलापूर हा प्रवास सर्व कार्यकर्त्यांसह राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसने केला.
केवळ भाषणांमधून नव्हे तर कृतीतून आदर्श निर्माण करण्याची परंपरा जपत, कृष्णराज महाडिक यांनी यापूर्वीही महाराष्ट्र दौऱ्यासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करून, पर्यावरणपूरक संदेश दिला होता. आज एस.टी.ने प्रवास करत त्यांनी साधेपणा आणि जनसामान्यांशी असलेली नाळ दाखवून दिली. तसेच राष्ट्रहितासाठी आवश्यक असलेल्या जबाबदारीची जाणीव कशी असावी, याचे उदाहरण राज्यातील युवकांसमोर ठेवले.
सामान्य नागरिकांप्रमाणे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून, त्यांनी इंधन बचत, प्रदूषण नियंत्रण आणि “विकसित भारत” या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला बळ देण्याचा संदेश दिला. त्यांच्या या कृतीमुळे युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असा प्रेरणादायी संदेश समाजात गेला आहे.
यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना कृष्णराज महाडिक यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन हे केवळ शासनाचे धोरण नसून, प्रत्येक भारतीयाने आपल्या जीवनशैलीत स्वीकारण्याची जबाबदारी आहे. युवा मोर्चाचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक वाहतुकीच्या वापराबाबत जनजागृती करतील, असेही त्यांनी नमूद केले.
भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा बार्शी ते सोलापूर एस.टी. प्रवास
Mumbai
light rain
28.5
°
C
28.5
°
28.5
°
79 %
11.9kmh
93 %
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°

