• ५,१०० विद्यार्थ्यांना मिळणार संधी
कोल्हापूर :
उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रिलायन्स फाउंडेशनने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. यंदा देशभरातील प्रथम वर्षात शिकणाऱ्या ५,१०० पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे. पदवीपूर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या कालावधीत ₹२ लाखांपर्यंत, तर पदव्युत्तर विद्यार्थ्यांना ₹६ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. पात्र विद्यार्थी रिलायन्स फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
एकूण ५,१०० शिष्यवृत्तींमध्ये ५,००० पदवीपूर्व आणि १०० पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचा समावेश आहे. देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेत पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणारे पात्र विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
पदवीपूर्व शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड गुणवत्ता आणि आर्थिक परिस्थिती या निकषांच्या आधारे केली जाईल. तर पदव्युत्तर शिष्यवृत्ती अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि लाइफ सायन्सेस यांसारख्या भविष्यातील महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आहे. आर्थिक सहाय्यासोबतच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, नेतृत्व विकास, नेटवर्किंग तसेच उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.
रिलायन्स गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून सहाय्य करत आहे. आतापर्यंत ३३,००० हून अधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळाला आहे. गेल्या वर्षी निवड झालेल्या ५,१०० विद्यार्थ्यांमध्ये देशातील २७ राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेशांतील १,३५० संस्थांमधील विद्यार्थ्यांचा समावेश होता.
——————————
रिलायन्स फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
28
°
74 %
5.1kmh
98 %
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°

