Homeशैक्षणिक - उद्योग ग्रुप क्वालिफाय नसणाऱ्यानाही होता येणार इंजिनियर

ग्रुप क्वालिफाय नसणाऱ्यानाही होता येणार इंजिनियर

कोल्हापूर :
बारावीमध्ये शिकत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंग मध्ये करिअर करण्याची इच्छा असते आणि त्यामुळे ते विद्यार्थी बारावीला गणित हा विषय घेऊन बोर्डाची परीक्षा देतात, CET किंवा JEE ची परीक्षा देतात आणि बऱ्याच वेळेला त्या मुलांना CET किंवा JEE मध्ये चांगले मार्क्स मिळतातही परंतु त्यांचा इंजिनिअरिंग साठी आवश्यक असणारा PCM ग्रुप क्वालिफाय होत नाही, त्यामुळे त्यांच्या पदरी निराशा येते. अशा वेळेला काही विद्यार्थी एक वर्ष गॅप घेऊन, पुन्हा परीक्षा देऊन, चांगले मार्क्स मिळवून आपली स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. अश्या वेळेस विद्यार्थ्यांचे एका वर्षाचे शैक्षणिक नुकसान होते व काही विद्यार्थी यामध्ये यशस्वी होत नाहीत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देऊनही अपयश आले आहे किंवा ज्यांना ग्रुप क्वालिफाय न होऊन ही इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचे ठरविले आहे असे विद्यार्थी ‘ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग’ मध्ये आपले करिअर करू शकतात.
ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगमध्ये आपलं करिअर करायचे असेल पण ते PCM ग्रुप क्वालिफाय करत नसतील परंतु बारावीला खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एकूण 45% मार्क्स व इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एकूण 40% मार्क्स मिळाले असतील आशा विद्यार्थ्यांना आता ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग मध्ये करिअर करण्याचा मार्ग उपलब्ध आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
27.8 ° C
27.8 °
27.8 °
78 %
8.7kmh
100 %
Fri
28 °
Sat
29 °
Sun
28 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page