कोल्हापूर :
रिलायन्स फाउंडेशनच्या पुढाकाराने रिलायन्स जिओच्या कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
रिलायन्स जीओकडून ‘स्वछता ही सेवा’ २०२५ अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (दि.२७) जिओच्या कर्मचाऱ्यांनी राज्यातील सर्व शहरांमध्ये हे अभियान राबविले. एकत्रितपणे एकाच दिवशी विविध उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, कार्यालय परिसराची स्वछता करून स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण केली. यावेळी प्लास्टिक आणि तत्सम कचरा गोळा करण्यात आला.
या स्वच्छता मोहिमेमध्ये जिओचे महाराष्ट्र कार्यालय, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर येथील क्षेत्रीय कार्यालये तसेच महाराष्ट्रातील ८९ जिओ सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळी शेकडो किलो प्लास्टिक आणि तत्सम कचरा गोळा करण्यात आला.
रिलायन्स जीओकडून ‘स्वछता ही सेवा’ अभियान
Mumbai
haze
30
°
C
30
°
30
°
66 %
2.6kmh
40 %
Tue
30
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
30
°
Sat
30
°

