इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 18 व्या हंगामाचा अंतिम सामना 3 जून 2025 रोजी खेळवला जाणार आहे. या हंगामात पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने क्वालिफायर-1 जिंकून थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्जने (PBKS) दमदार कामगिरी करत क्वालिफायर-2 मध्ये विजय मिळवून अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले आहे. पण आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पाऊस खेळ खराब करू शकतो का आणि या सामन्याचा निकाल कधी येऊ शकतो, चला जाणून घेऊया.
आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात हवामान कसं असेल?
चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे, अंतिम सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता फारच कमी आहे. हवामान विभागाच्या ताज्या अहवालानुसार, 3 जून रोजी अहमदाबादमध्ये आकाश स्वच्छ राहणार असून पावसाची शक्यता फक्त 20 टक्के आहे. त्यामुळे सामना कोणत्याही व्यत्ययाशिवाय खेळवला जाऊ शकतो.