Homeशैक्षणिक - उद्योग डेटा प्रमाणे एआय होणार स्वस्त, जियो जोडणार भारताला ‘इंटेलिजन्स एरा’शी

डेटा प्रमाणे एआय होणार स्वस्त, जियो जोडणार भारताला ‘इंटेलिजन्स एरा’शी

• मुकेश अंबानी यांची घोषणा
कोल्हापूर :
उद्योगपती मुकेश अंबानी यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये घोषणा केली की, ज्याप्रकारे जियोने देशात डेटा स्वस्त केला, त्याचप्रमाणे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) देखील सर्वसामान्य भारतीयांपर्यंत परवडणाऱ्या दरात पोहोचवण्यात येईल. “भारत इंटेलिजन्स भाड्याने घेऊ शकत नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी इंटरनेट युगानंतर आता देशाला ‘इंटेलिजन्स एरा’शी जोडण्याचा निर्धार व्यक्त केला.
या दृष्टीने जियो आणि रिलायन्स इंडस्ट्रीज पुढील सात वर्षांत ₹१० लाख कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती अंबानी यांनी दिली. भारतात सक्षम आणि भक्कम एआय पायाभूत संरचना उभारणे आणि आगामी दशकांसाठी आर्थिक बळकटी निर्माण करणे हा या गुंतवणुकीचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कंपनी जामनगर येथे टप्प्याटप्प्याने मल्टी-गिगावॅट एआय-रेडी डेटा सेंटर पार्क उभारत आहे. २०२६ च्या अखेरीस १२० मेगावॅट क्षमतेची सुरुवात करण्याचे लक्ष्य असून, पुढे ही क्षमता गिगावॅट स्तरापर्यंत वाढवली जाणार आहे. संपूर्ण प्रकल्प हरित ऊर्जेवर आधारित असेल. तसेच, जियो आपल्या नेटवर्कद्वारे देशभरात उच्च क्षमतेची संगणकीय सुविधा उपलब्ध करून देणार असून, त्यामुळे एआय सेवा कमी खर्चात आणि अधिक वेगाने नागरिक, दुकाने, शाळा, रुग्णालये आणि शेतांपर्यंत पोहोचतील.
अंबानी यांनी विशेषतः अधोरेखित केले की जियो एआय भारतीय भाषांमध्ये कार्य करेल, ज्यामुळे शेतकरी, युवक, विद्यार्थी आणि लघुउद्योगिकांना त्यांच्या मातृभाषेतून एआय चा लाभ घेता येईल. याच अनुषंगाने शिक्षणासाठी जियो शिक्षण एआय, आरोग्यासाठी जियो आरोग्य एआय, कृषीसाठी जियो कृषी आणि सर्वसामान्य वापरासाठी जियो भारत आयक्यू हे प्लॅटफॉर्म सादर करण्यात आले असून, हे स्थानिक भाषांमध्ये एआय-आधारित सहाय्य उपलब्ध करून देतील.
मुकेश अंबानी यांनी विश्वास व्यक्त केला की, तंत्रज्ञान सुलभ, परवडणारे आणि देशाच्या गरजांनुसार विकसित केल्यास भारत २१व्या शतकातील अग्रगण्य एआय शक्ती बनू शकतो. कनेक्टिव्हिटी क्रांतीनंतर आता एआयला पुढील राष्ट्रीय पायाभूत सुविधा म्हणून विकसित करण्याच्या दिशेने कंपनी पावले टाकत असल्याचे या घोषणेतून स्पष्ट होते.
एआय संदर्भातील संभाव्य चिंतेवर भाष्य करताना अंबानी म्हणाले की, एआय हा असा मंत्र आहे जो प्रत्येक यंत्राला अधिक वेगवान, अधिक सक्षम आणि अधिक स्मार्ट बनवतो. मी एआयला आधुनिक ‘अक्षय पात्र’ मानतो, जे अखंड पोषण देऊ शकते. एआय नोकऱ्या हिरावून घेणार नाही, उलट उच्च-कौशल्याधारित क्षेत्रांत नव्या संधी निर्माण करेल, असे त्यांनी सांगितले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
27.1 ° C
27.1 °
27.1 °
62 %
2.1kmh
67 %
Fri
27 °
Sat
28 °
Sun
27 °
Mon
27 °
Tue
27 °

Most Popular

You cannot copy content of this page