कोल्हापूर :
भुये व भुयेवाडी (ता. करवीर) येथील भैरोबा वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन समिती यांच्यावतीने रविवारी वृक्ष लागवड मोहीम उत्साहात पार पडली. भुये येथील भैरोबा माळावर या मोहिमेला निसर्गप्रेमी, वृक्षप्रेमी आणि भैरोबाभक्तांचा मोठा प्रतिसाद लाभला. या उपक्रमातून पर्यावरण जनजागृतीचा एक सकारात्मक संदेश दिला गेला.
या उपक्रमात सहभागी झालेले वृक्षप्रेमी स्वतः एक देशी झाड घेऊन आले होते व ते झाड स्वतः लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारीही स्वीकारली. यावेळी वड, पिंपळ, लिंब, करंज, म्हाळुंग, कवठ, चिंच, जांभूळ, सीताफळ, रामफळ, आंबा, पिपरणी, नारळ, लिंबू, पारिजातक व फुलझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. लावलेल्या प्रत्येक झाडाचे संरक्षण व संगोपन करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.
भैरोबा वृक्ष संवर्धन समिती भुये या समितीचे समन्वयक अमर पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केल्यावर शेकडो नागरिकांनी सकाळी आठ वाजता उपस्थित राहून उपक्रमात सहभाग घेतला.
याप्रसंगी भुये गावचे माजी सरपंच अभिजीत पाटील, ग्रामपंचायत सदस्य कृष्णात चौगुले, दिपक पाटील, अमर मिसाळ, शेतकरी संघटनेचे विक्रम पाटील, अमित पाटील, अरुण पाटील, प्रमोद माने, संपत पाटील, सर्जेराव पाटील, संजय पाटील, विकास पाटील, संतोष मानकापुरे, संभाजी पाटील (भुयेवाडीकर), तानाजी पाटील, देव पाटील, प्रदीप पाटील, आश्लेश खाडे, रामभाऊ पाटील, संपत पाटील, प्रणव पाटील, युवराज तळेकर, यशराज पाटील, रोहित पाटील, प्रथमेश पाटील, निलेश पाटील, सचिन पाटील, पार्थ पाटील, अथर्व पाटील, कान्होजी स्वामी, केदार पाटील, सुभाष साळोखे, दिनकर पाटील, दीपक शिंदे, शामराव पाटील, विष्णुपंत पाटील, केवल पाटील आणि हलगीसम्राट भार्गव आवळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.